Tuesday, January 12, 2016

" संकट BYPASS "

" संकट BYPASS "

हरी ओम

 माझा बापुराया हा सर्व संकटापेक्षा मोठा आहेच . त्याच्या बाळांवर येणारे प्रत्येक संकट तो हलकेच दूर करतो . स्वतः नामानिराळा राहणारा हा बापूराया कोणत्याही संकटाचा झाडा करतो आणि  त्याच्या बाळांवर प्रेमाची छाया धरतो . बापूंच्या सहवासाचा अनुभव येथे मी मांडत आहे ; कि त्याने किती सहजगत्या आमच्या घरावर  आलेले संकट दूर सारले .
    १९ डिसेम्बर चा दिवस श्री सत्चिदानंद उत्सवासाठी बापु ( श्रींच्या पादुका ) घरी आले . पहिले दोन दिवस सोहळा छान पार पडला . तिसऱ्या दिवशी म्हणजेच २१ डिसेम्बर ची ही गोष्ट ! माझे वडील एकनाथसिंह गुरव यांना सकाळी उठल्यापासूनच अस्वस्थ वाटत होते . पोटात अपचन आणि छाती भरल्यासारखी त्यांना वाटत होती . रोज सकाळी ८:३० ला ते कामाला ठाण्यावरून उरण ला जातात . गेले काही महिने DRIVER नसल्याने त्यादिवशीही त्यांनाच DRIVE करावे लागणार होते . बापूंना पाया पडून तशाच अवस्थेत ते कामावर जाण्यास निघाले . त्यांनी विचार केला कि वर्तक नगर नाक्यावर DISPENSARY मध्ये जाऊन औषध घ्यावे . अशा प्रकारे घरात कोणालाही अतिरिक्त होणाऱ्या त्रासाबद्दल न सांगता ते घरातून निघाले . आम्ही घरातील सर्व सकाळच्या पूजनाची तयारी करत होतो .
   वडील घरातून निघाल्यानंतर साधारणत : २५ ते ३० मिनिटांनी मला त्यांचा CALL आला ; म्हणाले कि "राहुल , जरा श्रोत्री डॉक्टर कडे ये ." इतकच बोलून त्यांनी   PHONE  ठेवला . त्यांच्या आवाजातील बदल मला जाणवला होता , म्हणून घरातील इतरांना काहीही न सांगता आधी परिस्थिती पाहून यावी म्हणून मी लगेच BIKE  वरून डॉक्टर कडे गेलो . तिथे पहिले तर वडीलांचा SHIRT उलटी ने खराब झाला होता . आणि ते शांत बसले होते . डॉक्टर ने मला जवळ बोलावून सांगितले कि , " तुझ्या वडिलांची तब्येत खराब आहे  . त्यांना इथे जेव्हा मी CHECK  करत होतो , तेव्हा त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले आणि त्यांना बेशुद्धावस्थेतच उलटीही झाली .  ताबडतोब जाऊन ECG  काढून ये . "
  मी ताबडतोब वडिलांना घेऊन जवळच्या हॉस्पिटल मध्ये  ECG  काढला , तिथल्या DOCTOR ने  ECG  मध्ये CHANGES  असल्याचे सांगितले . पण "  विशेष काही त्रास जाणवला तर या " असे सांगून वडिलांना गोळ्या लिहून  दिल्या . त्यानंतर मी वडिलांना घेऊन घरी आलो . घरी नुकतीच पूजा चालू होणार होती .  आई ला आणि लहान भावाला झालेल्या प्रकारची माहिती देताच सर्वानुमते JUPITAR  हॉस्पिटल ला एकदा दाखवून यावे असे ठरले . आम्ही सर्वांनी मिळून सकाळची पूजा केली . घरातून निघण्यापूर्वी सर्वांनी एकत्र शुभंकरा आणि अशुभनाशिनी स्तोत्र म्हंटले , वडिलांनी बापूंना साष्टांग नमस्कारही केला आणि मगच आम्ही निघालो .
  JUPITAR  हॉस्पिटल ला येऊन CHECK केले असता , हि तर EMERGENCY CASE आहे असे बोलून DIRECT वडिलांना I .C.U . मध्येच शिफ्ट केले .
क्षणभर खरच काहीच कळत नव्हते कारण सर्व काही इतक्या लवकर घडत होते कि काही समजायला भाग नाही . डॉक्टरने मला ICU च्या PROCEDURE करण्यास सांगितले , मी जाऊन येईस्तोवर  माझ्या वडिलांना ICU  मध्ये शिफ्ट करून झाले सुद्धा !! २४ तासांचे injection दिले , आणि ANGEOGRAPHY  करणार असल्याचे आम्हाला सांगितले गेले . आम्ही दादांना सांगावे म्हणून डॉक्टर पडेलकर यांना फोन करून सर्व माहिती दिली , त्यांनी ती दादांच्या कानावर घातली .
  दुसऱ्या दिवशी वडिलांचा REPORT आला , पण REPORT ABNORMAL होता . ५ ठिकाणी BLOCKAGES  असल्याने तिथे ANGEOPLASTY शक्य नव्हती , तिथे BYPAAS  हाच OPTION आहे असे समजले  . HEART BYPAAS हा शब्द फक्त ऐकण्यांत होता , परंतु तो प्रत्यक्ष माझ्या वडिलांवर होणार होता , हि आम्हा सर्वासाठी धक्कादायक घटना होती . डॉक्टरांशी भेटून झाल्यावर मी ताबडतोब सुचित दादांना भेटायला गेलो . दादा म्हणाले , " काही PROBLEM नाही , करून टाका . जास्तीत जास्त हनुमान चालीसा बोला ." दादांच्या बोलण्याने धीर आला . नंतर खाली गुरुक्षेत्रम मध्ये येताच बापूंचे सुद्धा जवळून दर्शन झाले . सर्व शुभशकून सोबत घेऊन पुन्हा हॉस्पिटलला आलो . दुसऱ्या दिवशी म्हणजे २३/१२/२०१६ ला सकाळी ८ वाजता माझ्या वडिलाची  BYPAAS ची शस्त्रक्रिया चालू झाली आणि ती तब्बल दुपारी २ वाजेपर्यंत चालू होती . शस्त्रक्रिया यशस्वी झाली . वडील पुढील आठवड्याभरात सुस्थिर होऊन घरी आले  .ह्या सर्व कथेमध्ये बापूंनी जी साथ दिली  ती अशी  -

  आपण गुरुचरित्रामध्ये वाचतो ; त्यात सायंदेवाच्या घरी श्रीगुरु येतात आणि त्याला अपमृत्यु पासून अभय देतात . सायंदेव घरी परत येईस्तोवर थांबतात . तो सुखरूप परत आलेला पाहून मगच पुढील मार्गास जातात .
ओवी :
- वडिलांच्या हॉस्पिटल मध्ये ADMIT होण्यापासून शस्त्रक्रिया करेपर्यंतचा काल हा श्रीसच्चिदानंद उत्सवाचा होता ; म्हणजेच ह्या  संपूर्ण काळात बापू आमच्या सोबत होतेच .  शस्त्रक्रिया यशस्वी झाली तो दिवस पुनर्मिलापाचा होता .

माझे वडील जेव्हा त्यांना अस्वस्थ वाटु लागले तेव्हा OFFICE ला न जाता डॉक्टर कडे गेले हि बुद्धी बापुंनीच दिली .
अनिरुद्ध एव बुद्धिदाता ।जर त्या परीस्थितीत स्वतः DRIVE करत डॉक्टर कडे न जाता ते पुढे गेले असते तर , संकट फार मोठे होते . पण  बापू सोबत असताना कसली फिकीर !!

वडील ADMIT  होण्याच्या आदल्या दिवशी रात्री श्रीसच्चिदानंद उत्सवाचे DECORATION चा भाग म्हणून मी भिंतीवर ३ ओव्या PRINTOUT लावल्या . आणि त्याच ओव्या तंतोतंत सत्यात उतरल्या  .

त्या तीन ओव्या अशा होत्या :

१.                                         ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण I त्यासी कैंचे भय दारुण I 
काळमृत्यु न बाधे जाण I अपमृत्यु काय करी II

२.  अपघाते भय जाई टळे अकाल मरण । संकटात मदत होई मिळे मनाधार ।।
                अपघाते जरी हे चरण पाही । त्यासही रक्षी संकटी ।।

३. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय । स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय ।।
    आज्ञेविन काल हि ना नेई त्याला । परलोकी हि ना भीती तयाला ।।

ह्या ३ ओव्यांचा तंतोतंत आम्हाला प्रत्यय आला .

  खरच , हा बापू सर्व संकटांहून खूप खूप मोठा आहे . आपण आपल लहान लहान PROBLEMS कुरवाळत बसतो पण त्यापेक्षा बापूंना जवळ केले तर प्रोब्लेम्स कधी येणारच नाहीत . फक्त एकच सांगतो , " माझा बापू काहीही करू शकतो ."


।। हरी ॐ  । श्री राम । अंबज्ञ ।।




No comments:

Post a Comment